पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैश्विक शक्ती, गुरु, सत्संग मदत करू शकतात काय?

इमेज
  Dialogue between J Krishnamurti and Jacob Needleman विचार हे नेहमी त्याने गोळा केलेल्या माहितीवर मंथन करत असतात. ज्यावेळी ते कंटाळतात त्यावेळी ते इतर नवीन गोष्टींच्या मागे लागतात. या नवीन गोष्टी परत त्याच्या माहितीचा भाग बनतात. विचारांना माहितीच्या जंजाळात भरपूर वाव असतो. परंतु जेव्हा आपण मला माहिती नाही असे म्हणतो तेव्हा विचार तिथे थांबतात. विचारविहिन अशी ती वैश्विक बुद्धिमत्तेची अवस्था असते.  Dialogue no 01 : https://youtu.be/hhfdRE1wONY वैश्विक शक्ती, सद्गुरु, सत्संग मदत करतात काय? JN: आपण असे म्हणता की मनुष्याने स्वतःच स्वतःचा मार्ग शोधायला हवा. यामध्ये मग वैश्विक सत्तेचा काही भाग नसावा काय?  JK: वैश्विक शक्ती, नियंता म्हटले की अवकाश आले आपण त्या विषयी बोलायचे आहे काय? JN: नाही. JK: मग आपल्या आतील अवकाश संबंधी? JN: दोन्हींचा विचार आवश्यक ठरेल. JK: बाह्य अवकाश अनंत आहे, आतील मर्यादित आहे. आपल्या आतील अवकाश आणि बाहेरील अवकाश यांचा संबंध आहे काय? आपल्या आतील अवकाश म्हणजे मिच्या सभोवतालची मोकळी जागा, दोन विचारांतील अंतर होय. ही आतील पोकळी मर्यादित आहे म्हणून आपण बाहेरी...

सत्य आणि वास्तव आणि त्यांची क्रिया

इमेज
डेव्हिड बोहम: मुख्य प्रश्न हा आहे की, जे सत्य नव्हे ते सत्य आहे असा भास होत असतो ते जिज्ञासूला स्पष्ट होऊ शकते का?  कृष्णमूर्ती: अगदी बरोबर आहे आपले. म्हणूनच, सर, आपण आकलन / समज म्हणजे काय आहे याकडे आपण परत गेले पाहिजे. जर मला आपण ज्याला वास्तव समजतो ते व्यवस्थित स्पष्टपणे समजायला हवे म्हणजे सर्व भ्रम आणि वास्तविकता, व्यावहारिकता आणि अवास्तवपणा - जर मी ते स्पष्टपणे पाहिले तर जे काय सत्य आहे त्याचे आकलन होवू शकते काय? ती जी समज अथवा जाणीव आहे तीच ही अशी क्रिया आहे ज्यामध्ये विचारांचा मागमूसही नसतो.  डेव्हिड बोहम: जेव्हा आपण सत्याचे आकलन / सत्याची समज होते असे म्हणतो तेव्हा तिथे सत्य आणि दृष्टा असे विभाजन संभवते. कृष्णमूर्ती: नाही, तेव्हा दृष्य आणि द्रष्टा असे विभाजन होत नसते तर फक्त आकलन होत असते.  डेव्हिड बोहम: भाषेमुळे गफलत झाली असावी. जेव्हा आपण आकलन करतो किंवा तथ्य पाहतो ते आकलन किंवा पाहणे हेच क्रिया असते, ती क्रिया हेच सत्य असते.  कृष्णमूर्ती: होय, सर.  जे काही (सत्य) आहे त्याची स्वतःची क्रिया असते. डेव्हिड बोहम: होय, किंवा सत्यच त्याची क्रिया आहे? कृष्णमूर...

सत्य आणि त्याची प्रत्यक्ष कृति

इमेज
जे कृष्णमूर्तीः सत्य जर भ्रामक कल्पना (विचार आधारित जीवन) पासून पूर्णपणे वेगळे असेल तर दोघांच्या तुलनेत प्रत्यक्ष कृतीला दैनंदिन जीवनामध्ये काय स्थान असू शकते? ज्याला सत्य जीवन जगायचे आहे त्याला सत्य जीवनातील कृती कशी असेल याची उत्सुकता असणार. ती सत्य कृती हि कोणत्याही आदर्श संकल्पनेशी आणि भूतकाळाशी निगडीत नसेल आणि म्हणून ती समय बद्ध नसेल. कृती समयातीत असू शकेल काय किंवा कृती ही नेहमी समय बद्ध असते काय? DR. AVID BOHM: आपणास असे म्हणायचे आहे काय की सत्य हे दैनिक मायावी जीवनामध्ये (Reality) कृती करू शकते. Reality चा सत्यावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही परंतु सत्य Reality वर परिणाम करीत असावे काय? जे कृष्णमूर्तीः होय . परंतु ज्याला केवळ सत्य जीवन जगायचे असेल जे Reality चे / विचारांचे सत्य नसेल, असे सत्य जे Reality शी संबंधित नसेल त्याच्या जीवनात सत्य कशी कृती करीत असेल? जी कृती रिॲलिटी शी संबंधित नसेल म्हणजे समयबद्ध नसेल अशी कृती असू शकेल? त्याचे मन त्याच्या भूतकाळाशी असलेले नाते संपवू शकेल? त्याचे मन भविष्य कालीन कल्पना करणे सोडून देईल? अशी कोणती कृती असेल जी मनाचा पसारा संपवू शकेल? DR. ...

सत्य कसे समजते

इमेज
जे कृष्णमूर्ती आणि Dr David Bohm जे कृष्णमूर्ती आणि डॉक्टर David Bohm यांच्या दरम्यान ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये खालील शब्दांचा संदर्भ महत्वाचा आहे. Reality हा शब्द ते मन आणि विचार यावर आधारित भ्रामक परिस्थिती बद्दल वापरीत असतात. जे आता जसे असेल त्याबरोबर जुळवून न घेता काय असावे किंवा काय नसावे याबद्दलच्या कल्पना म्हणजे भासमान जीवन.  Fact तथ्य  म्हणजे जे वास्तविक आहे ते. Action कृती हि तथ्याशी निगडित आहे, जे आता होत आहे किंवा अनुभव आणि आकलन या द्वारे प्रस्थापित झाले आहे. सत्य म्हणजे कृती. आकलन म्हणजे कृती आहे, तथ्य पाहणे म्हणजे कृती होय.  सत्य  - आपण वर्तमानकाळ ज्या अर्थाने घेतो त्या अर्थाने जे काही आता आहे त्याबरोबर जगणे. सत्य तथ्य स्थापित करते. तथ्य म्हणजे त्या क्षणाची वास्तविकता आहे. जे जसे आहे तसे सत्य असते.  कृष्णमूर्ती : चला आपण पाहूया की मनुष्य आता या क्षणी आणि सदैव फक्त सत्य परिस्थिती मध्ये जीवन व्यतीत करू शकतो काय? आपण ज्यास वर्तमान समजतो त्या वर्तमान काळात मनुष्य राहू शकतो काय? म्हणजे जे जसे आहे तसे राहणे आणि काहीतरी त्यापेक्षा वेगळे असावे किंवा वेग...

उपजीविकेची समस्या

इमेज
प्रश्नकर्ता : एक वेगळ्या प्रकारचे अनिश्ररवादी जीवन जगण्याची इच्छा असेल तर, बेकारी व मर्यादित संधी असलेल्या या जगात एखाद्याने उपजीविकेच्या समस्येकडे कशा प्रकारे पाहावे? कृष्णमूर्ती : त्यासाठी वेगळ्या स्वरूपाची सरकारे सत्तेवर आणणे जरुरीचे आहे—असे सरकार की,जे एका विशिष्ट गटापुरते मर्यादित नसेल. फ्रेंच सरकार, इंग्लिश सरकार व असे प्रत्येक सरकार फक्त आपआपल्या मर्यादित क्षेत्रापुरती काळजी घेत असते. आणि समस्या तेथेच आहे. सर, एक मानवजात या स्वरूपात काम करण्यापासून कोण आपणाला परावृत्त करीत आहे ? राष्ट्रीयत्व, धर्म व परंपरा यांनी आपण विभक्त झालो आहोत आणि त्यांना कवटाळून बसलो आहोत. जागतिक अशी अर्थव्यवस्थाच नाहीये. तुम्हाला समजतंय ना? या सर्वासंबंधी तुम्ही कधी विचार केलाय की नाही याचेच मला आश्चर्य वाटते. जागतिक स्वरूपाची अर्थव्यवस्था नाहीये. प्रत्येक देशाला त्याची त्याची अर्थव्यवस्था, त्याचे कायदेकानून, एका विशिष्ट जमिनीच्या तुकड्याबरोबर असलेले त्याचे व्यक्तिगत सारुप्य याचीच पर्वा असते. युरोपचे कधीही एकीकरण होऊ शकत नाही. कारण त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला कोणत्या ना कोणत्या प्रकारे काहीतरी सोसावे ला...

मानवी मनामध्ये अमुलाग्र बदल कसा करायचा?

इमेज
  आपली बाह्य परिस्थिती ही नेहमीच आपल्या अंतरंगा मध्ये बदल होण्यास विरोध करत असते. मनुष्यप्राणी मुळातच अविवेकी आहे, याचे कारण मानवी स्मृतीमध्ये हजारो वर्षांचे जे काही अज्ञान भरले गेलेले आहे ते अज्ञान माणसाला अविवेकी बनवते. मानवी स्मृती ही भूत काळामध्ये चालणारी म्हणजेच काळानुरुप चालणारी प्रक्रिया आहे. आत्मज्ञान किंवा अंतर्ज्ञान हे स्मृती वा काल यांच्या शिवाय कार्यरत असतात. म्हणून जोपर्यंत आपण पूर्व स्मृती व काळ यांच्या आधारावर मार्गक्रमण करीत असतो तोपर्यंत आपणास अंतर्ज्ञान प्राप्त होत नाही. पूर्व स्मृती व काळाचा आधार घेणारे हजारो वर्षांपासून मानवी मनाने निर्माण केलेले श्रद्धांचे ज्ञान मानवी समस्या सोडविण्यासाठी त्यामुळे हतबल ठरले आहे. यापुढील मानवी समस्या सोडविण्यास सुद्धा ते अपयशी ठरणार आहे. आत्मज्ञानाची इच्छा असणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये तेव्हाच अमूलाग्र बदल संभवतो जेव्हा सर्व पूर्वीचे ज्ञान व साधना निरर्थक आहेत असे त्याला समजून येते.  असे सत्यशोधक साधकच सत्य काय आहे हे ऐकण्यास व समजण्यास पात्र ठरतात. असे सत्यशोधक साधकच आपल्या मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणू शकतात.  आपल्याम...

होय, ते शक्य आहे

इमेज
गोंधळाच्या, वेदनादायक आणि नैराश्याच्या जगामध्ये आपण आपले आयुष्य शांतपणे जगू शकतो काय? होय, ते शक्य आहे. आपल्या आयुष्यात नेमका काय गोंधळ आहे, वेदना कोठे आहे, नैराश्य कशामुळे आले आहे हे जर का आपल्या नेमके लक्षात आले व ते नीटसे समजून घेतले तर आपल्या आयुष्यातील गोंधळ समाप्त होऊ शकतो व जीवन सहज आणि सुंदर होवू शकते. 

आत्मज्ञान

इमेज
मनुष्यप्राणी हा मुळातच अतार्किक आहे, अविवेकी आहे यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रचंड अव्यवस्थितपणा निर्माण झाला आहे त्याचे जीवन त्याला सूव्यवस्थित करण्यासाठी त्याला तार्किक व विवेकी बनणे अत्यावश्यक आहे.  विवेकी बनण्यासाठी प्रथम पायरी ही आहे कीं मी अविवेकी आहे हे स्वतःस कळले पाहिजे व ते कबूल करायला हवे. हे पूर्ण समजेतून कबूल केले की तत्क्षणी तो मनुष्य विवेकी बनतो. पूर्ण विवेकी मनुष्यास आत्मज्ञान प्राप्त होते.  अविवेकी पणा विचारांच्या मुळे निर्माण होत असतो. विचार म्हणजे मेंदूमधील स्मृतींची हालचाल होय. स्मृती म्हणजे मेंदूमध्ये साठविलेले अनुभव व पूर्वज्ञान होय. आत्मज्ञानी मनुष्य मेंदू अर्थात मेंदूमधील विचारांचा वापर न करता प्रत्यक्ष आत्मज्ञानी विचार त्याच्या मुखातून बाहेर पडत असतात !!! आत्मज्ञान किंवा आत्मज्ञानी विचार हे मेंदूमधील साठवले गेलेले पूर्वीचे विचार, पूर्व अनुभव, पूर्वज्ञान त्यांचा वापर करत नाही. आत्मज्ञानाची अवस्था कशी प्राप्त करावी?  आत्मज्ञानाची अवस्था ही कालातीत अवस्था आहे. काळ हा आत्मज्ञानी अवस्थेचा आधार होऊ शकत नाही. काल म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्...

प्रयोजन

१० फेब्रुवारी २०२१ [2/10, 9:37 AM] Praful Shamrao Kale Nijbodh: जे.कृष्णमूर्ती यांचे साहित्य  ज्या मनाला समज आली आहे अशा ज्ञानी व्यक्तींनी मराठी भाषेमध्ये  pdf स्वरूपात फ्री मध्ये साहित्य देण्याची सोय करावी (माफक शुल्क आकारले तरी चालेल) (जसे रामकृष्ण मिशन चे साहित्य माफक दरात असते किंवा pdf स्वरूपात मिळते, तसेच पांढरे साहेब यांनी सुद्धा त्यांचे सर्व साहित्य free स्वरूपात  उपलब्ध करून दिले आहे). [2/10, 11:03 AM] Vitthal Sawant: आपण जे कृष्णमूर्ती यांचा मराठी ब्लॉग सुरु करून त्यामध्ये j Krishnamurti यांचे इंग्लिश साहित्य मराठी मध्ये translate करून पोस्ट करू शकतो. परंतु या मध्ये copyright violation चा issue होवू शकतो काय याचा सुद्धा विचार करावा लागेल. श्री शिंदे साहेब दररोज जे मराठी मध्ये पोस्ट करतात ते ब्लॉग वर पोस्ट करू या असे मला अनेक दिवसांपासून वाटत आहे. फक्त copyright violation ची भीती आहे [2/10, 11:09 AM] Vijay Pandhare: कृष्णमुर्ति  च्या विचारांचे विनामुल्य  भाषांतर वा प्रसार प्रचार कोणी करत असेल तर  त्याला कोणीही हरकत घेणार नाही  कृष्णमुर्ति...