चैतन्य हे विचारांचे बनलेले आहे
चैतन्य हे फक्त विचार आहेत - कृष्णमूर्ति पारंपरिक तत्वज्ञान हे चैतन्य आणि त्याच्या चार अवस्था यांना अतिशय महत्त्व देते. जागृती, स्वप्न, सुशुप्ती, तुरिया अशा चैतन्याच्या त्यांनी वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या आहेत. जागृती मधील जाणीव आणि इतर अवस्थेतील जाणीव या वेगवेगळ्या आहेत आणि जी व्यक्ती या सर्व अवस्था आणि सर्व जाणिवांच्या अतीत जाईल त्याला सर्वज्ञ समजण्याचा पारंपरिक गैरसमज आहे. मुळात मी म्हणजे काय याची समज नसल्याने परंपरांनी त्याला आत्मा असे संबोधले होते. प्रत्येक जीवाचा जसा आत्मा तसा त्यांनी विश्वाचा विश्वात्मा, परमात्मा आणि त्यांच्या ब्रम्ह अवस्था अशा अनेक संकल्पना तयार केल्या. या काल्पनिक संकल्पनांचा कोणालाच अनुभव येत नसतो. म्हणून मग चार अवस्थांचा निरास झाल्या नंतर त्याची अनुभूती होईल असे त्यांनी खोटे सांगितले. त्यांनी त्यांचे अज्ञान अशा प्रकारे झाकून ठेवून त्या अज्ञानाला श्रद्धा च्या आवरणामध्ये अधिक मजबूत केले. कोणत्याही साधकाने कितीही मोठी साधना केली तरी तो चार अवस्थांचा निरास करू शकणार नाही आणि त्यांचे बिग फुटणार नाही याची तजवीज या चार अवस्था निराकरण लबाडी मध्ये आहे. कृ...